बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून जोपर्यंत स्पष्टता मिळत नाही. तोपर्यंत मला कोणतीच निवडणूक लढवण्याचा नैतिक अधिकार नाही. असा निर्णय मराठा आरक्षणाचे समन्वयक विनोद पाटील यांनी घेतला आहे. गेल्या आठ्वड्यापासून औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात त्यांच्या उमेदवारीची चर्चा केली जात होती. मात्र जोपर्यंत मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत मी कोणतीच निवडणूक लढणार नसल्याच विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर विनोद पाटील म्हणाले कि आरक्षण मिळाल्याशिवाय मी कोणतीच निवडणूक लढणार नाही. पण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आरक्षण मिळालं पण याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने ते अजून प्रलंबित आहे आणि त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही. तोपर्यंत मी निवडणूक लढवू शकत नाही. असं विनोद पाटील यांनी यावेळी सांगितलं.
मी ही राजकीय लढाई कोणतंही राजकीय हित डोळ्यासमोर ठेऊन केली नव्हती आणि आज जरी मी निवडणुकीला उभा राहिलो तर १०० टक्के मतांनी निवडून येईल. पण यामुळे माझे आरक्षणाच्या या चाललेल्या लढाईकडे दुर्लक्ष होईल. म्हणून मला ही निवडणूक लढायची नाही.असंही पाटील यांनी सांगितलं. तसेच ज्या पक्षांनी मला बिनशर्त उमेदवारी देण्याच मत व्यक्त केलं त्यांचे मी आभार मानतो असही पाटील यांनी यावेळी सांगितलं.