मूकनायक पुरस्कार सामाजिक न्याय रुजविण्यात भर पडणार : राजकुमार बडोले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्यायाचे प्रतिक असून त्यांनी केलेले सामाजिक, धार्मिक, आंदोलने हे भारतीय समाजाला सदैव प्रेरणादायी राहतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकाची सुरूवात करून इतिहास घडविला. त्यामुळे मूकनायक पुरस्कार सामाजिक न्याय रुजविण्यात भर पडणार, असे प्रतिपादन राजकुमार बडोले यांनी केले.
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराचे वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय आणि डॉ.बाबासाहेबआंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले. दरम्यान,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकाची सुरूवात करून इतिहास घडविला. जगातील प्रतिष्ठीत विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन त्यांनी संपूर्ण जीवन हे सामाजिक न्यायासाठी व्यतीत केले. मूकनायक हे अस्पृश्य समाजासाठी दीपस्तंभ ठरला असून या पाक्षिकाला शंभर वर्षे झाली आहेत. त्यामुळे या पुरस्काराचे विशेष महत्त्व आहे. या पुरस्कारामुळे सामाजिक न्याय समाजात रूजविण्यात भर पडणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्यायाचे प्रतिक असून त्यांनी केलेले सामाजिक, धार्मिक, आंदोलने हे भारतीय समाजाला सदैव प्रेरणादायी राहतील. असे राजकुमार बडोले यांनी म्हंटले.
याचबरोबर, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी अध्यासन सुरू करणार असल्याची घोषणा, संस्थेचे महासंचालक के.जी. सुरेश यांनी केली. तसेच बाबासाहेबांनी सुरू केलेले पाक्षिक मूकनायक पुनर्जिवीत करण्याचे काम आयआयएमसीच्या माध्यमातून केले जाईल, असेही त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मागास समाजात नवचेतना जागृत केली होती. बाबासाहेबांचा विचार हा सर्व समावेशी विचार होता. समाजात नवीन विचार देणे ही पत्रकारांची महत्त्वाची भुमिका असते. ही भुमिका शंभर वर्षापुर्वी बाबासाहेबांनी दिली होती. त्याला पुनर्जिवीत करण्याचे काम आयआययएमसीव्दारे केले जाईल, असेही त्यांनी म्हंटले.