बहुजननामा ऑनलाईन – सर्वोच्च न्यायालयात अयोध्या रामजन्मभुमी खटल्याच्या सुनावणीला वेग आला आहे. न्यायमुर्ती रंजन गोगाई यांनी खटल्याच्या सुनावणीच्या २६ व्या दिवशी दोन्ही पक्षांना एक महिन्याच्या आत त्यांचे युक्तीवाद पुर्ण करण्यास सांगितले आहे. तसेच वेळ पडल्यास शनिवारीही सुनावणी करण्यास आम्ही तयार आहोत. असेही त्यांनी सांगितले.
त्यांनी खटल्याच्या सुनावणी दरम्यान काही महत्वाचे मुद्दे मांडले. त्यात त्यांनी येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत खटल्यातील युक्तीवाद पुर्ण करण्यासाठी दोन्ही पक्षांना आदेश दिले आहेत. प्रत्येक पक्षाने दिलेल्या कालावधीत त्याचा युक्तीवाद पुर्ण कऱण्याचा प्रयत्न करावा. १८ ऑक्टोबर पर्यंत सुनावणी पु्र्ण झाल्यास आम्हाला निर्णय घ्यायला किमान ४ आठवडे लागतील. मध्यस्थीसंदर्भात एक पत्र मिळाले आहे. जर पक्षांना परस्पर वाटाघाटीद्वारे हा विषय निकाली काढायचा असेल तर तो कोर्टासमोर ठेवा. आपण मध्यस्थी करू शकता. त्याची गोपनीयता राहील.
रामजन्मभुमी आणि बाबरी मस्जिद विवादावर रोज सुनावणी होत आहे. त्यापुर्वी आठवड्यातून तीन दिवस सुनावणी होत होत्या. त्यानंतर न्यायालयाने आठवड्यातून पाच दिवस सुनावणी करण्याचा निर्णय घेतला.
Visit : bahujannama.com