बहुजननामा ऑनलाइन टीम –
आंतरराष्ट्रीय स्तरावर वक्तव्यांमुळे तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानवर पुन्हा एकदा तोंडावर पडण्याची वेळ आली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचेमध्ये पुन्हा एकदा पाकिस्ताना खोटारडेपणा उघड झाला आहे. 24 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील पाकिस्तानंने केलेले वक्तव्य रकॉर्डवर घेतले जाणार नसल्याचे सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार्या इंडोनेशियाने म्हटले आहे. पाकिस्तानचे राजदून मुनीर अक्रम यांनी वक्तव्य न दिल्यामुळे ते रेकॉर्डवर घेतले जाणार नसल्याचे युएनएससीने म्हटले आहे .
पाकिस्तानचे वक्तव्य रेकॉर्डवर घेतले जाणार नसल्याची माहिती इंडोनेशियाने भारताला दिली आहे. पाकिस्तानच्या स्थायी मिशनने मंगळवारी एक ट्विट करत वक्तव्य केले होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादावर भाषण केल्याचा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला होता. परंतु पाकिस्तानच्या राजदूतांना अशा प्रकारचे कोणतंही भाषण केले नव्हते. जेव्हा भारताने पाकिस्तानच्या खोटपणाचा उघड केला, त्यावेळी युएनएससीच्या अध्यक्षांनी ही कारवाई केली. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडघशी पडले आहे.