मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत मित्र पक्ष जागावाटपाच्या तयारीला लागले आहेत. अशात आता विधानसभेच्या जागावाटपात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने 10 जगांची मागणी केली आहे. तसेच कमळ चिन्हावर न लढवण्याबाबत बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, “ही निवडणूक कोणत्याही परिस्थिती भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले म्हणाले की, “आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये युती तर्फे मित्रपक्षांना 18 जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या 10 जागांपैकी 10 जागा आरपीआयला मिळाल्या पाहिजेत. या निवडणुकीत आम्ही भाजपच्या कमळ चिन्हावर नाही तर, आमच्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत.”
याआधी रामदास आठवले यांनी पुण्यात बोलताना म्हटले होते की, “लोकसभा निवडणुकीत विनायक मेटे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होते. त्यामुळे त्यांच्याबाबतीत युतीने विचार करावा. आरपीआयसाठी मागणी करण्यात येणाऱ्या 10 जागांपैकी कँटोंमेंट मतदारसंघ आणि जिल्ह्यातील एक जागा मिळाली पाहिजे.”