आसाम : वृत्तसंस्था – आज देशाला बदनाम करण्यासाठी करस्थान रचणारे एवढ्या खालच्या पातळीपर्यंत पोहचले आहेत की, भारतीय चहाला देखील ते सोडत नाहीत. हे कारस्थान रचणारे म्हणत आहेत की, योजनाबद्धरित्या भारतीय चहाच्या प्रतिमेला जगभरात बदनाम करायचं आहे. परदेशात असलेल्या काही शक्ती चहा बरोबर भारताची जी ओळख जोडलेली आहे, त्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) आसाम येथील सभेत बोलताना केला.
#WATCH | People who are conspiring to defame India have stooped so low that they're not sparing even Indian tea… Some documents have come up revealing that some foreign powers are planning to attack India's identity associated with tea. Will you accept this attack?: PM in Assam pic.twitter.com/6BCOBIn1ET
— ANI (@ANI) February 7, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममध्ये 7 हजार 700 कोटी रुपयांच्या ‘असोल माला’ प्रकल्पाचा शुभारंभ केला. याशिवाय राज्यात दोन वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यासाठी भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. पंतप्रधानांनी ग्रेटा थनबर्गच्या टुलकिट खुलाशावरही उत्तर दिलं.
चहाची प्रतिमा मलिन करण्याचा कट
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या चहाची प्रतिमा मलिन करायची असल्याचे हे कट रचणारे म्हणत आहेत. काही दस्तऐवज समोर आले आहेत. भारताची ओळख ज्या चहाशी आहे त्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे यातून समोर आलं आहे., तुम्हाला हे सर्व चालणार आहे का ? हा हल्ला करणाऱ्यांचं कौतुक तुम्हाला मान्य आहे का ? या सर्व राजकीय पक्षांना भारताच्या चहाची बाग असलेलं ठिकणाच उत्तर देईल. भारतात चहावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यामध्ये इतकी ताकद नाही की ते या चहा कामगारांचा सामना करु शकतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
चहाची ही लढाई नक्कीच जिंकणार
आसामच्या भूमीवर या कट रचणाऱ्यांना जे काही कट रचायचे आहेत ते रचू दे. मात्र, आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही लढाई नक्कीच जिंकणार असल्याचे त्यांनी नमूद केलं. हिंसाचार, भेदभाव, तणाव, पक्षपात, संघर्ष या सर्व गोष्टींना मागे सोडून आता संपूर्णपणे पूर्वोत्तर भाग विकासाच्या मुद्यावर पुढे जात आहे. यामध्ये आसामची भूमिका महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.