नवी दिल्ली वृत्तसंस्था : जम्मू- काश्मीर संदर्भातील कलम ३७० हटविण्यासारख्या महत्वपूर्ण घटनांची पूर्तता भाजप सरकारने केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणावर भाजपचा सकारत्मक परिणाम होणार असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटण्याची चाहूल लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला युतीमुळे राजकीय सत्ता स्थिर होण्यास मदत झाली होती. परंतु हीच युती विधानसभेच्या वेळी टिकणार का ? असं प्रश्न निर्माण झाला आहे.
३७० कलम रद्द केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजप सरकारचे कमळ कोणाच्याही आधार न घेता, स्वबळावर फुलण्याची शक्यता आहे. शिवसेनेची मदत न घेता भाजप सत्ता बळकट करू शकते असे अंदाज बांधले जात आहे. त्यामुळे महायुती करायची कि नाही ? हा प्रश्न भाजप च्या मनात खालावू शकतो.
हीच धास्ती शिवसेनेनी देखील घेतली आहे. भाजपने जरी युती करण्याचे ठरविले तरी जागावाटपामध्ये भाजप जास्त जागा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कलम ३७० हटविण्याचे विधेयक मांडल्यामुळे भाजप सरकारवर कौतुकाची थाप पडली आहे. परंतु काँग्रेस सोबतच अन्य विरोधी पक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सोबतच उत्तर भारत बिहार, झारखंड राज्यातही भाजपची चांगलीच छाप उमटली आहे. त्यामुळे इतर राज्यातही भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष ,अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांसारख्या राज्यपातळीवरील पक्षांना फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.