बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई: रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी(Arnab Goswami arrest case) यांना अटक केल्याने भाजप सरकारविरुद्ध आक्रमक झाले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना घडली असल्याचं म्हंटल आहे. राज्य सरकारविरुद्ध आवाज उठवा, संघर्ष करा, आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.
भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही. म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्याप्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती, ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली.या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.” असे या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
मी महाराष्ट्रातील जनतेला आणि आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण आपल्या पद्धतीने राज्य सरकारचा आंदोलन करून विरोध करा – उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा. काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे, की हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात.. महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही.” असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम !
आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे