बहुजननामा ऑनलाइन टीम –भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर अभिनेता अर्जुन रामपालने प्रतिक्रिया दिली आहे. चीन सातत्याने जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीत देशवासीय शांत का आहेत? असा सवाल त्याने केला आहे. त्याचा हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Why is everyone so quite about the Chinese, who keep inching into our territory? Is there any news which is more important than this? Where are the politicians and journalists now? Why so quite? #IndiaChinaBorderTension
— arjun rampal (@rampalarjun) September 1, 2020
चीनने पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर कुरापती केल्या आहेत. त्याशिवाय घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैन्याचा हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला. त्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला असून, यावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. दरम्यान भारत-चीनमधील या तणावावर अभिनेता अर्जुन रामपाल याने प्रतिक्रिया दिली आहे. चीनसोबत संघर्ष सुरु असताना आपण इतके गप्प का? चीन सातत्याने आपली जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतोय. दररोज एक-एक इंच आत येण्याचा प्रयत्न करतोय. इतक्या मोठ्या विषयावर देशातील पत्रकार आणि राजकारणी गप्प का? यापेक्षा दुसरा कुठला मोठा विषय सुरु आहे का? आपण इतके गप्प का बसलोय. अशा आशयाचे ट्विट अर्जुन रामपालने केले आहे. दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहने कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत.