बहुजननामा ऑनलाईन टीम : देशात सर्व ठिकाणी आंदोलन सुरु असताना बॉलीवूड देखील या मुद्यावर सोशल मीडिया वरून आपलं मत व्यक्त करत आहेत. बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक अनुराग कश्यपने सोशल मीडियावरून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. अनुराग कश्यप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भावनांच्या पलिकडे आहेत.
अनुराग कश्यपने ट्विटच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ते म्हणाले कि आमचे मुख्य सेवक, आमचे पंतप्रधान, जनतेचे मुख्य नोकर बहिरे व मुके आहेत आणि भावनांच्या पलिकडील आहेत. ते फक्त नौटंकी आहेत जे भाषण देऊ शकतात. बाकी सगळं त्यांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यांना ना दिसत आहे नाही ऐकू येत आहे. आता ते नवीन नवीन खोटं शिकण्यात व्यग्र आहेत.अनुराग कश्यपने यापूर्वीही आरोप केला होता कि सरकार समर्थक दंगे सुरु करतात आणि त्यानंतर जनतेवर पोलीस तुटून पडतात.
हमारा प्रधान सेवक , हमारा प्रधान मंत्री , जनता का प्रधान नौकर @narendramodi बहरा है, गूँगा है , और भावनाओं के परे है । वो सिर्फ़ एक नौटंकी है जो भाषण दे सकता है बाक़ी कुछ उसके बस का नहीं है । उसको ना दिखाई दे रहा है ना सुनाई दे रहा है । वो अभी नए नए झूठ सीखने में व्यस्त है ।
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) December 20, 2019
आता सध्या देशात जी स्तिथी आहे आहे त्याला भाजप जबाबदार आहे.चिघळलेल्या परिस्थितीमागे भाजपचाच हात आहे, असासुद्धा आरोप अनुराग कश्यप यांनी केला आहे.नागरिकत्व दुरुस्ती विधेयक नुकतेच संदसेत संमत करण्यात आले आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे भारतजवळच्या बांगलादेश,अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या तीन देशांमध्ये असलेल्या मुस्लिमेत्तर अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. देशभरातुन या विधेयकाला विरोध होत आहे.
Visit : bahujannama.com