बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना महामारीच्या दरम्यान देशाच्या अनेक भागात अनेकदा लॉकडाऊन आणि कर्फ्यू लावण्यात (Supreme Court)आला. यावरून सुप्रीम कोर्टाने एक कठोर टिप्पणी केली आहे. कोर्टाने म्हटले की, कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लागू करण्याच्या सर्व निर्णयांची घोषणा अगोदर केली गेली पाहिजे. जेणेकरून लोक आपल्या उपजिविकेसाठी अगोदरच तरतूद करू शकतील.
कोरोना महामारीदरम्यान देशाच्या अनेक भागात केंद्र आणि राज्य सरकारांनी लॉकडाऊन आणि संपूर्ण कर्फ्यू लावण्याची घोषणा केली होती. तर, सध्या देशाच्या अनेक राज्यात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
देशात अजूनही कोरोनाची प्रकरणे कमी होताना दिसत नाहीत. दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोनाची नवी प्रकरणे समोर येत आहेत. यामुळे राज्य सरकारे आपल्या येथे नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा करत आहेत. आज सुप्रीम कोर्टाने केलेली टिपण्णी याबाबतच आहे की, जी राज्य सरकारे नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊनची घोषणा करतील, त्या अगोदरच केल्या जाव्यात, ज्यामुळे सामान्य जनतेला योग्यप्रकारे तयारी करता येईल आणि कोणतीही अडचण येणार नाही.