मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात अखेर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळालं. तर या निवडणूक प्रचारात खारीचा वाटा उचलणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेयांच्याही कष्टाचा चीझ झालं. काही दिवसांपूर्वी १८ तारखेला मी मोठी घोषणा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, अमोल कोल्हेंनी घोषणा केली आहे.
खा.डॉ अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश आले असून किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टी व रोपवे, वढू तुळापूर येथे ऐतिहासिक वारसास्थळ शंभुसृष्टी निर्मिती करण्याच्या मागणीला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. खासदारडॉ अमोल कोल्हे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मती सह रोप-वे निर्मिती करण्यात यावी, तसेच वढू तुळापूर या ठिकाणी शंभूसृष्टी उभारण्यात यावी अशी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना पर्यटन व सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी लेखी पत्राद्वारे लवकरच या निर्मितीसाठी केंद्रीय समितीमार्फत सर्व्हे केला जाईल, पॉलिसीनुसार त्यांनतर पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असे अमोल कोल्हेंनी सांगितले.
याच आश्वासनाची मागणी १० डिसेंबरच्या संसदीय भाषणात कोल्हेंनी शून्यप्रहारामध्ये केली होती. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि तमाम शिवभक्तांचे शक्तीतीर्थ असणाऱ्या किल्ले शिवनेरी येथे आबालवृद्धांना दर्शन घेता यावे यासाठी रोपवे आणि पायथ्याशी शिवप्रभूंचा पराक्रम आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती याचे दर्शन घडवणारी “शिवसृष्टी”साठी लवकरच मार्ग निघेल, असे कोल्हेंनी सांगितले. अखेर शिवसृष्टीला हिरवा कंदील मिळाल्याची घोषणा झाली.
Visit : bahujannama.com