बहुजननामा ऑनलाइन – भारताच्या लडाख परिसरात चीनच्या लष्कराच्या अलिकडच्या घुसरखोरीचे कर्तेकरवीते स्वत: राष्ट्रपती शी जिनपिंग आहेत. परंतु, भारतीय लष्कराने ज्या आक्रमक पद्धतीने उत्तर दिले, त्यामुळे चीनी नेतृत्व आश्चर्यचकित झाले आहे. 15 जूनला गलवान खोर्यात झालेल्या हिंसक हाणामारीत भारताचे 20 जवान शहीद झाले, तर उत्तरादाखल केलेल्या कारवाईत चीनचे किमान 43 सैनिक मारले गेले, ही संख्या 60 सुद्धा असू शकते. भारताच्या या अनपेक्षित उत्तराने चीनचे पाऊल फ्लॉप ठरले. चीनी राष्ट्रपती आता भविष्यात आपल्या देशात निर्माण होणार्या आव्हानांपासून वाचण्यासाठी बचावाचा मार्ग शोधत आहेत.
न्यूजवीकचा खळबळजनक खुलासा
ही बाब अमेरिकेतील प्रतिष्ठित मॅगझिन न्यूजवीकने आपल्या ताज्या अंकात मांडली आहे. यामध्ये लिहिले आहे की, चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी यावेळी बदलाच्या काळातून जात आहे. अशात जिनपिंग यांच्यासाठी आव्हाने वाढत आहेत. भारतीय सीमेवर चीनच्या लष्कराचे अपयश पार्टी संघटनेत जिनपिंग यांच्यासाठी महागात पडू शकते. पीपल्स लिब्रेशन आर्मी (पीएलए) चे अयशस्वी होणे जिनपिंग यांच्यासाठी दुष्परिणाम देणारे ठरू शकते. पँगोंग सरोवराच्या उत्तर किनार्यावर पीएलएने घुसखोरी करून कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी जवळच्या पर्वतावर भारतीय सैनिकांनी कब्जा मिळवला.
भारतीय सैनिकांचे प्रत्येक ठिकाणी बारीक लक्ष
आता चीनी सैनिकांच्या सर्व हालचाली भारतीय सैनिकांच्या नजरेच्या टप्प्यात येत आहेत. थोडी जरी गडबड केल्यास त्यांना निशाणा बनवता येऊ शकते. राष्ट्रपती जिनपिंग चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमीशनचे सुद्धा चेअरमन आहेत. यामुळे पीएलएवरील प्रत्येक हालचालीसाठी ते जबाबदार आहेत.
पीएलए कोणतेही पाऊल त्यांच्या संमतीशिवाय उचलू शकत नाही. यावरून स्पष्ट होते की, लष्कराचे सर्वोच्च अधिकारी म्हणून जिनपिंग यांनीच भारतीय सीमेचे उल्लंघन करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. मॅगझिनने फाऊंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रेसीजसाठी पास्कलनुसार गलवानमध्ये झालेल्या संघर्षात चीनच्या मारले गेलेल्या सैनिकांची संख्या 60 पर्यंत असू शकते असे म्हटले आहे.
चीनी लष्कराला मिळाले तोडीसतोड उत्तर
भारतीय सैनिकांनी ज्या मारक क्षमतेने चीनी लष्कराला उत्तर दिले, त्याची अपेक्षा चीनला नव्हती. यामुळे संघर्षात आपल्या नुकसानीबाबत चीन काहीही बोलू शकला नाही. ही बाब जिनपिंग यांच्यासाठी येणार्या दिवसात महागात पडू शकते. चीनच्या लष्करासाठी आश्चर्यकारक वेळ तेव्हा होती, जेव्हा सप्टेंबरच्या सुरूवातीला भारतीय लष्कराने आजूबाजूच्या पर्वतांवर कब्जा केला. यामुळे खोर्यातील सर्व चीनी सैनिक निशाण्याच्या टप्प्यात आले. चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांचा कब्जा सोडवण्याचा प्रयत्नही केला परंतु यश आले नाही.