बहुजननामा ऑनलाईन – पैशांनी पद विकत मिळत नसत. मी माझ्या राजकीय आयुष्यात चरित्र आणि चारित्र्याला महत्व देतो. तसेच पैसै देणे आणि घेणे माझ्या कोणत्याही निकषांमध्ये बसत नाही. अशा प्रकारचे आरोप फक्त बिनबुडाचे आहेत. यावर मी जास्त स्पष्टीकरण देणार नाही. असे स्पष्टीकरण रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले.
काही दिवसांपुर्वी क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी ” आमच्या काकांनी ५० कोटी रुपये देऊ मंत्रीपद घेतल.” असा आरोप बीडमधील जाहीर सभेत केला होता. त्यावर जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर देत पुतण्याने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. तसेच हा आरोप म्हणजे बालिशपणा असून तो आता जनतेसमोर आला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
तसेच अहंकाराची धुंदी फार वेळ टिकत नाही. राजकारणाचा पोरखेळ सुरु आहे. आरोप प्रत्यारोप करताना मी कधीही खालची पातळी गाठली नाही. तुम्ही असे खालच्या पातळीचे आरोप करत आहात म्हणजे तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमवला आहे. अशा भावनाही यावेळी क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या.