नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीननंतर कोरोना वायरसने भारताच्याही दरवाज्यावरही टकटक केली आहे. भारताच्या अनेक भागात कोरोना वायरसबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोना वायरसच्या वाढत्या धोक्याची दखल घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. हर्षवर्धन सिंह म्हणाले, आतापर्यंत चीनहून आलेल्या सर्व प्रवाशांची एयरपोर्टवर स्क्रीनिंग केली जात आहे. जेणेकरून या वायरसने भारतात शिरकाव करू नये. डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, कोरोना वायरसच्या आतापर्यंत जेवढ्या टेस्ट झाल्या, त्या सर्व निगेटिव्ह आढळल्या आहेत. हा वायरस पसरण्यापूर्वी जे लोक चीनहून भारतात आले होते, केंद्र सरकारने त्यांच्याही टेस्ट केल्या आहेत.
कोरोना वायरस काय आहे ?
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीएस)नुसार, कोरोना वायरस ऊंट, मांजर अशा जनावरांच्या शरीरात पोहचला आहे आणि तो घातक होत होऊ लागला आहे. काही प्रकरणात या वायरसमुळे निमोनियासुद्धा होऊ शकतो. या वायरसची काही लक्षणे एमईआरएस आणि सार्सशी मिळती-जुळती आहेत.
कोरोना वायसपासून असा करा बचाव
1 खोकताना, शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा.
2 हा वायरस हवेद्वारे एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पोहचतो. यासाठी तोंडावर मास्क लावा.
3 कोणत्याही व्यक्तीसोबत हात मिळवल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा.
4 सर्दी, फ्ल्यूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींजवळ जाऊ नका. जर अशा व्यक्तींच्या संपर्कात येत असाल तर डोळे, नाक आणि तोंड झाकून घ्या.
5 जंगली जनावरांना आणि पाळीव प्राण्यांपासून दूर रहा.
6 कोणत्याही प्रकारचे मांस खावू नका. पूर्णपणे शिजवलेले मांस खा.
किती घातक आहे कोरोना वायरस ?
सर्वसाधारणपणे कोरोना वारयसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे दिसून येतात. परंतु, गंभीर प्रकरणात या वायरसमुळे व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
Visit : bahujannama.com