नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन वर्षांपुर्वी अल्वर येथे मॉब लिंचिंगमध्ये मारल्या गेलेल्या पहलू खान याच्याविरोधातच पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. त्यात त्यांच्या दोन मुलांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकणात देशभरात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यात एमएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत कॉंग्रेसवर हल्ला चढविला आहे. त्यांनी मुस्लीमांना सतर्क राहाण्यास सांगितले आहे.
असदूद्दीन ओवेसी यांनी यासंदर्भात ट्विट करून कॉंग्रेसवर हल्ला चढविला आहे.
Congress in “Power” is replica of BJP ,Muslims of Rajasthan must realise this,reject such individuals/organisations who are brokers of congress party,& start developing their own independent political platform ,70 years is a long time please CHANGE https://t.co/gLsimg1m50
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 29, 2019
काय म्हणाले ओवेसी ?
कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर भाजपप्रमाणेच बनते. राजस्थान मधील मुस्लीमांनी ही बाब समजून घेतली पाहिजे. कॉंग्रेस पक्ष दलाल असलेल्या संस्था आणि लोकांना मुस्लीमांनी नाकारले पाहिजे. त्यांनी आपला राजकिय मंच विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सत्तर वर्षे खुप असतात. कृपया आता तरी बदला.
राजस्थान मध्ये मॉब लिंचिंगमध्ये मारल्या गेलेल्या पहलू खानवर आणि त्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल करून राजस्थान पोलिसांनी दोषारोपत्र दाखल केले आहे. त्यामुळे देशभरात मुस्लीम समाजाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नुकताच छत्तीसगडमध्ये झालेल्या जमावाच्या हल्ल्यात तबरेज अंसारी याचा मृत्यू झाला आहे. त्याविरोधात देशभरात निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत.