बारामती : बहुजननामा ऑनलाईन – अधिवेशनाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी धनगर समाजाविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा .धनगर समाज कृती समितीच्या इंदापुर शाखेच्या वतीने निषेध व्यक्त केला असून समाजाविषयी बोलताना जबाबदारीने बोलावे. अन्यथा आपणांस मल्हार सेना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा धनगर समाजातील सरसेनापती मल्हारराव होळकर यांनी दिला आहे.
अधिवेशन काळात जयंत पाटील यांनी विधान भवनात अधिवेशनात जाणीवपूर्वक नियोजनबद्धपणे राज्यातील समस्त धनगर समाजाला अवमानित करण्याच्या हेतूने समाजाला शेळ्या मेंढ्या म्हणून संबोधले. त्यांनी केलेले हे विधान समाजाच्या भावना दुखावणारे आहे. समाजाला जनावरांची उपाधी देवून संपूर्ण राज्याचे लक्ष असणाऱ्या विधान भवनात केलेले हे वक्तव्य निषेधार्थ आहे.
दरम्यान ,जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाचा संबंध महाराष्ट्रातुन तसेच राज्यात विविध ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये वाडी – वस्तीवरती जाहीर निषेध चालू आहे. पाटील यांनी प्रसार माध्यमासमोर जाहीर माफी मागावी. धनगरसमाजाबद्दल केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे ,की राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे मत आहे. याचा खुलासा करावा. आत्तापर्यंत आमच्या समाजाला आरक्षणाच्या नावाखाली भोळ्या प्रामाणिक समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेवून कसे गंडवले, याची प्रचीती त्यांच्या या वक्तव्यातून दिसून आली आहे.
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे जाणीव ठेवावी. आमच्या समाजाविषयी बोलताना जबाबदारीने बोलावे. अन्यथा आपणांस धनगर समाजातील सरसेनापती मल्हारराव होळकरांची मल्हार सेना आपणांस महाराष्ट्रात फिरू देणार नाही ,असा इशारा पाटील यांना देण्यात आला आहे.