पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणेकर सध्या वाढत्या गरमीला वैतागले आहेत. जसजसा उन्हाळा वाढत आहे. तसतसे घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होत असल्याचे हवामान खात्याने नोंदविले आहे. सकाळच्या उन्हातही थांबणे नागरिकांना नकोसे झाले आहे. नागरिकांना आता पुणे तिथे काय ‘’उन” ए अशी म्हणण्याची वेळ आली आहे. उन्हामुळे बाहेर पडण्यापेक्षा घरात बसणे योग्य असे त्यांना वाटत आहे.
कालपासून सकाळी ही उन्हाचा चटका लागत असल्याने सकाळपासूनच नागरिकांना उष्णतेचा चांगलाच चटका जाणवत आहे. पुण्यात आत्तापर्यंत ३० एप्रिल १८९७ साली ४३.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये या तापमानात वाढ झाल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शविला आहे. त्यानुसार रविवारी दुपारी कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस. हे तापमान वाढणार असल्याचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा ५.१ सेल्सिअसने तापमान वाढले होते. सकाळी तापमान ४.२ सेल्सिअसने वाढून २५.४ अंश ने नोंदले गेले.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चोवीस तासात शहर परिसरात उष्णतेची लाट जाणवणार आहे. तापमानाचा पारा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण त्याचबरोबर जागतिक तापमानाची समस्या आता फक्त पृथ्वीच्या ध्रुवावरील बर्फ वितळण्यापुरती किंवा समुद्राची पाणीपातळी वाढण्यापुरती मर्यादित राहणार नसून ती शहरापर्यंत पोहचणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. असा अंदाज गेल्या दोन दिवसांपासून होता. पुढील एक ते दोन दिवस उन्हाचा चटका असाच कायम राहणार. त्यानंतर अंशतः तापमान कमी होईल. पुण्यातील या कमाल तापमानाच्या मागे जागतिक तापमान हे शक्य कारण आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव यांनी दिली.