मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे. वरळी मतदारसंघातून ते निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी तगडा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅड. सुरेश माने हे त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.आदित्य यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आदित्य हे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. त्यांची निवडणूक सोपी व्हावी म्हणून शिवसेनेनं आधी राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन अहिर यांना गळाला लावले. आदित्य यांच्याकडे युवासेनेचे प्रमुखपद सोपविण्यात आले.
गेली पाच वर्षे आदित्य हे सक्रिय होते. २९ वर्षीय आदित्य यांनी निवडणुकीपूर्वी जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागांमध्ये दौरे करीत जनतेशी संवाद साधला होता. आदित्य ठाकरे हे उद्या (गुरूवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने ते त्या उद्या वरळीत शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन होण्याचीही शक्यता आहे.
Visit : bahujannama.com