नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तिन्ही अधिकाऱ्यांना डेप्युटेशनवर दिल्ली येथे बोलवण्यात आले आहे. जेपी नड्डा यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी ही कारवाई केली.
तृणमूल कॉंग्रेसने (टीएमसी) गृह मंत्रालयाच्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी गृहमंत्रालयावर पश्चिम बंगालच्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांंना दहशत दाखवल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांंना डेप्युटेशनवर पाठविणे, त्यांच्यावर दबाव आणणे ही गृहमंत्रालयाची रणनीती आहे. असे केल्याने राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी भाजप नेत्यांवरील हल्ल्यासाठी ममता सरकारवर निशाणा साधला. कैलाश विजयवर्गीय यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी भाजप नेत्यांवर विटांचा वर्षाव करीत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावरही हल्ल्याचा कट रचला गेला, परंतु भाजपचे स्वतःचे धोरण आहे. आम्ही आमची सहनशीलता सोडत नाही. आम्ही वीटेेेचे उत्तर फुलांनी देऊ. आमचा ‘कमळ’ राज्याला नवी ओळख देईल.
दरम्यान, जेपी नड्डा दोन दिवसांच्या दौऱ्यावर पश्चिम बंगालमध्ये होते. गुरुवारी जेपी नड्डा डायमंड हार्बरच्या दिशेने जात असताना वाटेत त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या काळात जेपी नड्डा सुरक्षित होते, पण कैलास विजयवर्गीय यांना दुखापत झाली आहे.पक्षाच्या अध्यक्षांच्या ताफ्यावर अशा हल्ल्यापासून भाजप संतापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेपी नड्डा, कैलास विजयवर्गीय, यांची स्थिती जाणून घेण्याची मागणी केली असता अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह इतर सर्व मंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि ममता सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 3 एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत, तर 7 जणांना अटक करण्यात आली आहे. बंगाल पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात दोन एफआयआर दाखल केले आहेत. याशिवाय जमावाला भडकवल्याच्या आरोपात भाजप नेते राकेश सिंहविरुध्द पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे.
बंगाल पोलिसांच्या म्हणण्यानुसार जेपी नड्डा यांच्या ताफ्याला z सुरक्षेशिवाय बंगाल पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा पुरविली होती. 4 अतिरिक्त एसपी, 8 डिप्टी एसपी, 8 इन्स्पेक्टर, 30 अधिकारी, 40 RAF, 145 कॉन्स्टेबल, CV 350 सीव्हीज् जे.पी यांच्या ताफ्याच्या रस्त्यावर आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती.