बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. यानंतर बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर सर्वात मोठी असणारी देशातील सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) बँकेचा तिमाही निकाल नुकताच जाहीर केला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर व्यापार आठवड्यांच्या शेवटच्या उच्चांकी पातळीवर गेला. तर गुंतवणूकदारांना १ ते ५ फेब्रुवारीच्या कालावधीत एका शेअरवर १२४ रुपयांचा नफा झाला आहे. बँकेच्या गुंतवणूकदारांचीही मोठी कमाई झाली आहे.
दरम्यान, १ फेब्रुवारीला SBI चा शेअर भाव २८४ रुपये होता, जो ५ फेब्रुवारीला थेट ४०८ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. म्हणजेच गुंतवणूकदारांना थेट १२४ रुपयांचा नफा झाला आहे. यामध्येही ज्या गुंतवणूकदारांनी या काळात SBI चे १००० शेअर्स खरेदी केले, त्यांना थेट १.२४ लाख रुपयांचा नफा झाला आहे. अशी माहिती बँकेने दिली आहे.
तर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) दिलेल्या माहितीनुसार, शेअर्समध्ये तब्बल ४१.७८ टक्क्यांनी तेजी पाहायला मिळत आहे. यासोबतच SBI च्या शेअर्समध्ये एका महिन्यात ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर एका वर्षाच्या आत या सरकारी बँकेच्या शेअर्समुळे समभागांनी गुंतवणूकदारांना ४५ टक्के नफा मिळवला आहे. शेअरच्या किंमती वाढल्यामुळे बँकेची बाजारपेठ ३,४९८००.१५ कोटी रुपयांवर गेली आहे.