मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. विरोधकांकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना शिवसेनेतच दोन गट पडल्याची माहिती समोर येत आहे. राठोड यांनी राजीनामा द्यावा असे एका गटाचे म्हणणे आहे. तर त्यांनी राजीनामा दिला तर त्यांनी आरोप मान्य केल्यासारखे होईल, असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. संजय राठोड हे पूजाच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यामुळे संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही दबाव वाढत आहे. असून राठोड यांच्या राजीनाम्यावरुन पक्षात दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे.
आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप झाल्यानंतर भाजपने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी सोशल मिडिया वर आपली बाजू मांडली. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नाही. हा मुद्दा पुढे करुन शिवसेनेच्या एका गटाने राठोड यांच्या राजीनाम्याच्या विरोधात असल्याचे समजतय. तर राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला तर त्यांनी आरोप मान्य केल्यासारखे होईल, असे एका गटाचे म्हणणे आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र राठोड यांच्यावरुन शिवसेनेत कोणतेही गट नसल्याचे सांगितले. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राठोड यांच्या राजीनाम्याचा निर्णय सरकारमधील प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील. त्यामुळे शिवसेनेत कोणतेही गट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.