बहुजननामा ऑनलाइन टीम – ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय, त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकूमशाही प्रवृत्तीची भीती वाटत नाही का? फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असे वाटत होते,(Bhatkhalkar) पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले, असा टोला शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना लगावला. या मुद्द्यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर (bjp-leader-atul-bhatkhalkar) यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला आहे.
सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली, त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सुरांची चिंता करू नये, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. आजवर महाराष्ट्रात डौलाने फडकणारा भगवा खाली खेचण्याची तुमचे पोलीस हिंमत करतात हे राज्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवाळाची चिंता करा, अशा शब्दात आ. भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सडकून टीका केली आहे.
सामनातून फडणवीसांवर टीका
देवेंद्र फडणवीस यांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होत, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचे शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले. आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरण समोर आणले नाही. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद त्यांनी चालवले आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, तुरुंगातच टाकले जात आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे, अशी ‘थाप’ मारून त्यांनी सूर पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला, असे सामनाच्या अग्रलेखात नमूद केले आहे.