पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे दिसून आली. पुढील काळात जर विधानसभा निवडणुकीत शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) हे तीन पक्ष एकत्र लढले तर भाजपचे (BJP) 50 आमदार देखील निवडून येणार नाहीत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत केले होते. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी दगाबाजांबरोबर आघाडी करुन सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करायच्या नसतात, असा टोला लगावला आहे.
… तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत: जयंत पाटील
दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करू नये.
जयंतराव भाजपाच्या पराभवाबाबत इतके आश्वस्थ आहात तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या… दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत… pic.twitter.com/Mhqs6IhLyv— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 10, 2020
अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांच्या विधानाच्या बातमीचे ट्विट करत जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, दगाबाजांबरोबर आघाडी करुन सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करु नये. जयंतराव भाजपाच्या पराभवाबाबत इतके आश्वस्थ आहात तर उद्या विधानसभा बरखास्त करुन राज्यात निवडणुका घ्या… दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत. असे ट्विट करत भातखळकर यांनी जयंत पाटील यांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित कार्यक्रमाची महिती देण्यासाठी जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला जयंत पाटील यांनी उत्तरे दिली.
भाजपला हैदराबाद आणि राजस्थान येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. आता भाजपने मिशन मुंबईचा नारा दिला आहे. याबाबत जयंत पाटील यांनी विचारण्यात आले असता ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढली, तर भाजपचे 50 आमदार देखील निवडून येणार नाहीत.