बहुजननामा ऑनलाइन टीम : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीच्या विरोधात गुरुवारी धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. ‘ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागलं आहे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ग्रहण लागलं आहे, त्याचा परिणाम संपुर्ण देशावर झाला आहे. अशा शब्दात अॅड. प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.’
सीएए कायदा हिंदूवर परिणाम करणारा आहे. त्यास विरोध म्हणून हे आंदोलन आहे. पोलिसांनी विरोध केला तरी आम्ही आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला. त्याचबरोबर देशाच्या आर्थिक स्थितीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने सीएए व एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे मुद्दाम संभ्रम तयार करतात, वेगवेगळी विधान देतात. नागरिकतत्व कायद्याच्या फटका केवळ मुस्लिमांना नव्हे तर देशातील हिंदूंनाही बसणार आहे. तब्बल 40 टक्के हिंदू या कायद्यामुळे अडचणीत येणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. सीएए व एनआरसीच्या मुद्द्यावर मोदी, शहा खोटे बोलत आहे.
आरएसएस ही संघटनाच खोटेपणाच्या पायावर उभी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नागरिकत्व कायद्याविरोधात आजचे धरणे आंदोलन यशस्वी होईल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनात भटके-विमुक्त मोठ्या संख्येने भटके-विमुक्त सहभागी होणार आहेत. हे लोक रुढीपरंपरांच्या ‘डिचेन्शन’ मधून आता कुठे बाहेर आले असले तरी अजूनही त्यातील अनेकांचा संसार गाढव व घोड्याच्या पाठीवर सुरु आहे. त्यामुळे शेकडो ओबीसींनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे. नव्या कायद्यामुळे ते पुन्हा एकदा कायद्यामुळे ते पुन्हा ‘डिटेन्शन’ मध्ये शक्यता नाकारता येत नाही. असे ते म्हणाले.
Visit : bahujannama.com