बहुजननामा ऑनलाइन टीम : राज्यात ठाकरे सरकार स्थापन होऊन महिना झाला तरीही अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त लागला नाही. अनेक दिवसांपासून लांबणीला लागलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर प्रश्न सुटणार आहे. येत्या ३० डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आता उद्धव ठाकरे यांची अग्निपरिक्षा आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागणीमुळे विस्तार करताना पेच निर्माण झाला आहे. सध्या सेनेकडे उद्योग खातं आहे. या खात्यासह उपमुख्यमंत्रिपदासाठी कॉंग्रेस आग्रही असल्याचे समजत आहे. गृह खातं राष्ट्रवादीकडे असल्याने कॉंग्रेस उपमुख्यमंत्रिपदाची मागणी करत असलाचे समजत आहे.
महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये खातेवाटप झाले होते. यामध्ये गृह खाते सध्या तरी शिवसेनेकडे आहे पण ते राष्ट्रवादीकडे देण्यात येणार आहे. तर कॉंग्रेसकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण खाती आहे. कमी आमदार असतानाही कॉंग्रेसला चांगली खाती देण्यात आली आहेत. कॉंग्रेसमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी बड्या नेत्यांच्या हालचाली सुरु आहे. दोन माजी मुख्यमंत्री मंत्रिपदासाठी इच्छुक आहे.
अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यायचे झाले तर कॉंग्रसला महत्वाची खाती हवी आहे. यासाठीही कॉंग्रेसकडून उद्योग खात्याची मागणी केली जात आहे. सुभाष देसाई यांच्याकडे सध्या उद्योग खात्याचा भर सोपविण्यात आला आहे. देसाई यांच्याकडे भाजप आणि सेनेच्या युती सरकारमध्येही उद्योग खाते होते. राष्ट्रवादीला गृह खाते दिल्यास सेनेकडे महत्वाचे म्हणावे असे नगरविकास हे एकच खाते राहते. त्यामुळे सेनेसमोर पेच निर्माण झाला आहे.
Visit : bahujannama.com