बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सर्व पक्ष आपल्या महाशिवआघाडीची घोषणा करू शकतात. दरम्यान, आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली, ज्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी का सोडली या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही आमच्या २५ वर्ष जुन्या युतीला का सोडले, ते आमच्याशी खोटे बोलत होते हे तुम्हालाही समजते आहे. मागील वर्षांत त्यांनी काय सांगितले आणि काय केले हे तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे आता आपण नवीन युती करणार असून त्यात शेवटचा टप्पा सुरू आहे. ज्यावर संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात होईल. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी आमदारांकडून सतत केली जात आहे. त्यावर त्यांनी योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे आज कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात अंतिम फेरी बैठक होणार आहे. ज्यामध्ये युतीवर शिक्कामोर्तब होणार असून लवकरच ते जाहीर केले जाईल. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल आणि पक्षाचा चेहरा असल्याने उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली पाहिजेत, असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे. नव्या युतीमध्ये मुख्यमंत्रिपद शिवसेनेच्या खात्यात जात असून कॉंग्रेस व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते. तसेच मंत्रीपदासाठी १४-१४-१४ फॉर्म्युला असल्याचे समजते.
Visit : bahujannama.com