बहुजननामा ऑनलाईन : बाबरी मशीद पक्षकार इक्बाल अन्सारी यांच्यासह पाच जणांवर देशद्रोही तसेच अन्य कलमांवरील पाच खटल्यांचा चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने मंगळवारी दिले. न्यायालयीन दंडाधिकारी देवेंद्र प्रताप सिंग यांच्या न्यायालयात आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंगचा अर्ज स्वीकारत या प्रकरणी तीन दिवसांच्या आत अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वकील संगीता सिंह आणि उच्च न्यायालय लखनऊ खंडपीठाचे वकील राजेश त्रिपाठी म्हणाले की, प्रतापगड जिल्ह्यातील अंतु पोलिस स्टेशनच्या रायचंदपूर भागात राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंहने आरोप केला आहे , कि, ३ सप्टेंबर रोजी त्या त्यांचा भाऊ प्रभु दयाल सिंह याच्यासह अयोध्या येथे रामजन्मभूमी बघायला आले होते. जेथे राम मंदिर बांधण्याबाबत काही लोकांमध्ये चर्चा झाली. यावेळी काही लोक मला इक्बाल अन्सारी यांच्या घरी घेऊन गेले.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तेथे त्याची भेट झाली. येथे तीन महिला, एक मुलगा आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. वर्णिका इकबाल अन्सारी यांना म्हणाले की काका, आपण मंदिर-मशिदीसाठी आपसात का भांडतो, त्या वरती असलेल्याला आठवण्यासाठीच ना ! यावर ते म्हणाले की, ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री सत्तेत राहण्यासाठी राजकारण करीत आहेत. लोकांना दिशाभूल करीत आहेत. त्यांच्याकडे येथे हे राम मंदिर बांधण्याची इतकी शक्ती नाही. कारण हे लोक मुस्लिमांना फार घाबरतात. देशाचा कायदा अपमानकारक असल्याचे सांगत इक्बाल म्हणाले की, राम मंदिर बाबत कोणतेही न्यायालय निकाल देऊ शकत नाही. जर राम मंदिराच्या निर्णयावर कायद्याने हुकूम दिला तर मी पाकिस्तानच्या लोकांना बोलावून देशातील एका व्यक्तीला ठार मारीन आणि अयोध्याला दुसरे पाकिस्तान बनवून टाकीन.’
त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत अपशब्द काढले आहेत. जेव्हा वर्णिकाने त्याला देशातील एक चांगला नागरिक असल्याचे सांगून योग्य प्रकारे वागायला सांगितले तेव्हा ते चिडून उठले आणि म्हणाले की मी तुला सुद्धा नेमबाजांकडून ठार करवू शकतो. भगवान रामाचा अपमान करणारे बरेच शब्द त्यांनी काढले, त्यानंतर त्या घरातील स्त्रिया आणि तेथे उपस्थित असलेल्या मुलाने वार्तिका सोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी वार्तिकने ६सप्टेंबरला एसएसपी अयोध्यामार्फत, उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक, उत्तर प्रदेश सरकारचे प्रधान सचिव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी स्पीड पोस्टाने आणि मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार दाखल केली पण त्यांचा अहवाल नोंदविण्यास कोणतीही सुनावणी झाली नाही. त्यानंतर आपल्या वकिलामार्फत न्यायालयात संपर्क साधला. कोर्टाची सुनावणी घेतल्यानंतर या प्रकरणातील गंभीर गुन्हा आढळल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Visit : bahujannama.com