बहुजननामा ऑनलाईन – कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप -शिवसेनेत प्रवेश केला. त्यातूनच आगामी विधानसभेची जोरदार तयारी भाजप आणि शिवसेनेन सुरु केली असल्याचे दिसत आहे.मात्र त्याच वेळी मुख्यमंत्रीपदाच्या महत्वकांक्षेमुळे युतीतच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूकांमधील जागावाटपावरुन युतीत हा तणाव वाढल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपने जागावाटपासंदर्भात मांडलेल्या एका प्रस्तावानुसार भाजप विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला १२० ते १२५ जागा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर इतर मित्रपंक्षासह १६३ ते १६८ जागांवर भाजप निवडणूकीच्या रिंगणात उतरू शकते. मात्र भाजपने हाच प्रस्ताव कायम ठेवल्यास शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात.
कारण मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं ६३ जागा जिंकल्या होत्या. या प्रस्तावात भाजपने तितक्याच जागांची भर टाकून शिवसेनेला १२५ जागा देण्याचा विचार केला आहे. मात्र हा प्रस्ताव शिवसेनेला मान्य असेल की नाही हे पाहण औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभा निवडणूकींच्या यशानंतर विधानसभा निवडूकांसाठी शिवसेनेला जास्त जागा मिळाव्यात, यासाठी युतीतच स्पर्धा सुरु झाली आहे. भाजपने काही दिवसांपुर्वी निवडणूकांसाठी एक सर्वे केला होता. या सर्वेतून पुढील आकडेवारी समोर आली आहे.
विधानसभा निवडणूकीत भाजप – शिवसेना युती आणि कॉंग्रेस – राष्ट्रवादी यांच्या लढतीत युतीला २०० जागा, तर आघाडीला ८८ जागा मिळतील. मात्र भाजपने स्वबळावर लढण्याचे ठरविल्यास भाजपला १६० जागा, शिवसेनेला ९० जागा, तर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या वाट्याला ३८ जागांसाठी लढावे लागेल. पण भाजप शिवेसेना एकत्र लढल्यास युतीला २३० जागा मिळू शकतात. आता विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्रीपदाच्या जागेवरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरुन युतीत दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. भाजपचे नेते मुख्यमंत्रीपदावर भाजपचाच माणूस असेल असे म्हणत आहे. तर दुसरीकडे शिवसेनाही मुख्यमंत्री पदावर शिवसेनेचा दावा करत आहे. या वादामुळे भाजप शिवसेनेत नक्की काय ठऱल आहे. असा प्रश्न पडला आहे.