बहुजननामा ऑनलाईन टीम – आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाने वेढा टाकला असून, अर्थचक्रच ठप्प झाले आहे. दुसरीकडे मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा लाखाच्या पुढे गेला असून, आतापर्यंत 6 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मुंबईत आतापर्यंत 4 लाख 70 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी 23 टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत. तर मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर 1.06 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
#CoronavirusUpdates
25-July, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/gaiS5cfWbD— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 25, 2020
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही 66 दिवसांवर पोहोचला आहे. काल दिवसभरात मुंबईत 1 हजार 90 बाधितांची नोंद झाली, तर 52 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढत असला तरी मृत्युदर अद्याप खाली आलेला नाही. मुंबईत आतापर्यंत 6033 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर सध्या 5.5 टक्के इतका आहे.
मुंबईतील 73 टक्के रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याच्या टक्केवारीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57 टक्के आहे. एकूण बाधितांचा आकडा 1 लाख 7 हजार 981 इतका आहे. शनिवारी 617 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 78,877 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर 1,197 रुग्णांची स्थिती गंभीर आहे.