पुणे : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसामध्ये राज्यात वातावरणामध्ये बदल होऊन अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झालीय. वारंवार तापमान कमीजास्त होताना दिसत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये तापमान कमी झालं आहे. अवकाळी पाऊसाचा फटका अनेक शेतकऱ्यांना पूर्वीच बसला आहे. तर आता आणखी ५ दिवस महाराष्ट्रात अवकाळी मान्सून कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आलाय.
तसेच अवकाळी मान्सून संपूर्ण भारतभर विविध भागात देखील पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आगामी ५ दिवस देशात विविध भागात अवकाळी मान्सून निर्माण जाणार असल्याचं भारतीय वेधशाळेनं म्हटलं आहे. तसेच आज महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हयामध्ये अवकाळी मान्सूनचं सावंत आहे. म्हणून आगामी ३ ते ४ तासामध्ये पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरात वाऱ्याच्या वेगात पाऊसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवला आहे.