ओबीसी समाजाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या दारी
मुंबई : वृत्तसंस्था –“राज्य सरकार बरखास्त करा,” अशी मागणी ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे. प्रकाश शेंडगे यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी आज राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान ही मागणी करण्यात आली आहे.
प्रकाश शेंडगे यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान, “स्वातंत्र्यानंतर राज्यात पहिल्यांदाच राज्य सरकारने आरक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे. सर्व लहान जाती अस्वस्थ आहेत, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना आहे. या सरकारने मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गात आरक्षण देण्याचे मान्य केले होते. मात्र कायदा करतांना त्यांना एसईबीसीमध्ये म्हणजेच ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच “राज्यात आधीच ५० हजार नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे. तरीही सरकार मेगाभरती करत आहे. आधी बॅकलॉग भरा मग मेगाभरती करा. अशी मागणी त्यांनी केली. इतकेच नव्हे तर, “न्यायालयातही या सरकारने ओबीसी आरक्षणाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यांनी न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली नाही. या सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त करा” अशी मागणीही त्यांनी केली.
विशेष म्हणजे, ओबीसी समाजाच्या २७ टक्के आरक्षणामध्ये मराठा समाजाला येऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्यापालांनी दिल्याचेही त्यांनी म्हंटले.