नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भाजपसोबत हातमिळवणी करावी असा सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. बहुजन समाज पक्षाची आघाडी समाजवादी पक्षासोबत जास्तकाळ टीकणार नाही. मायावतींनी भाजपसोबत हातमिळवणी केली पाहिजे. असे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले.
उत्तरप्रदेशातील भाजप आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर टीका केली होती. दरम्यान मायावतींवर झालेल्या टीकेला प्रतिउत्तर देतांना, भाजपाच्या पाठिंब्याने मायावती उत्तर प्रदेशच्या तीन वेळा मुख्यमंत्री झाल्या आहेत. सपासोबतच्या आघाडीचा लोकसभा निवडणुकीत अपेक्षित फायदा होणार नाही, हे बसपाच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. सपाऐवजी मायावतींनी भाजपाशी हातमिळवणी केली पाहिजे. उत्तर प्रदेशमधील विविध भागातून आलेल्या अहवालानुसार सपा आणि बसपाच्या आघाडीच्या निर्णयावरून त्यांचे समर्थक नाराज आहेत. असे त्यांनी म्हंटले.
याचबरोबर, मागील वर्षी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत गोरखपूर, फुलपूर आणि कैरानात येथे भाजपचा पराभव झाला होता. त्यातही भाजप कमी मतांच्या फरकाने पराभूत झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत देईल आणि सपा-बसपा आघाडीचा एनडीए पराभव करेल, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याचबरोबर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने ८० पैकी ७१ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी अधिकाधिक दलितांनी भाजपला पाठिंबा दिला होता. उत्तर प्रदेशमध्ये बसपापेक्षा रिपाइंला दलित जनतेचा पाठिंबा आहे.असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर भाजपा आमदार साधना सिंह यांनी जी टीका केली त्या टीकेवर त्यांनी पुन्हा एकदा आक्षेप घेत. नेत्यांनी वैयक्तिक हल्ला करू नये. या वक्तव्यामुळे बसपालाच फायदा होईल. असेही ते म्हंटले.