मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाजाची मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. पण मी त्यांच्या आनंदात खडा टाकू इच्छित नाही, असा टोला भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
मराठा समाजाची मते मिळवण्यासाठी भाजपाने आरक्षण दिले. मराठा समाजाची मते मिळाल्यास भाजपाच्या जागा १७० पर्यंत जातील, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे. पण मी त्यांच्या आनंदात खडा टाकू इच्छित नाही. इतकेच नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ओबीसी समाजात भीती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. याचबरोबर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच कॉपी करत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी विक्रोळीतील सभेत भाजपावर गंभीर आरोप केला होता. ओवेसींच्या मदतीने देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा डाव असून याबाबत माहिती देणारा फोन आपल्याला दिल्लीवरुन आल्याचा दावा त्यांनी केला होता. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, मी हा मुद्दा महिनाभरापूर्वीच मांडला होता. राज ठाकरेंना डोके नाही. ते माझीच कॉपी करत असून राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा आरोप मी महिनाभरापूर्वीच केला होता. असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच कॉपी करत आहेत अशी बोचरी त्यांनी केली.