अक्कलकोट : बहुजननामा ऑनलाइन – आजच्या तरूण पिढी पुढे राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. त्यांनी दिलेले देश व महिला यांचा आदर करणारे विचार तरूण पिढीने आत्मसात करावे, असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी केले.अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त प्रतिमा पूजना प्रसंगी भोसले हे बोलत होते.
याप्रसंगी मराठा सेवा संघ सोलापूरचे उपाध्यक्ष बळीराम हेबळे, कुरनूरचे संरपंच व्यंकटराव मोरे आदीजण उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वजित बिराजदार, प्रमोद काळे, मनोज सुरवसे, समर्थ काळे, आकाश सुरवसे, आनंद बिराजदार, शशिकांत चंडके, गोपाळ बिराजदार, पवन बिराजदार, अमोल काळे, शुभम पाटील आदीजणांनी परिश्रम घेतले. दरम्यान, ‘स्वराज्य निर्मितीसाठी जिजाऊंचे योगदान’ या विषयावर व्याख्यान प्राध्यापक खंडू खंडळे यांनी दिले. प्रास्ताविक विश्वजीत बिराजदार यांनी केले. तर सूत्रसंचलन दिगंबर जगताप आणि आभार अभिजीत काळे यांनी मानले.