सांगली : पोलीसनामा ऑनलाईन
राज्यात मराठा समाजाची सत्ता नाही, तसेच मराठा समाजातील ८० कुटुंबाची सत्ता आहे असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले.
सांगलीत वंचित बहुजन आघाडी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान राज्यात मराठा समाजातील ८० कुटुंबाची सत्ता आहे राज्यात मराठा समाजाची सत्ता नाही. इतकेच नव्हे तर यापुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मराठा नसतील असेही भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर आज बाजार समित्या या लुटारूंचा अड्डा झाल्या आहेत. विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळावा त्यांना एक व्यासपीठ मिळावे यासाठी यशवंतराव चव्हाणांनी बाजार समित्यांची स्थापना केली होती मात्र त्यांच्या वारसदारांनीच आज बाजार समित्या लुटारुंचा अड्डा करून ठेवल्या आहेत. अशी टीकाही त्यांनी केली.
विशेष
म्हणजे यावेळी बोलतांना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादी
काँग्रेस वरही टीका केली. त्यावेळी यापुढे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार
मराठा नसतील, राज्यात मराठा समाजातील ८० कुटुंबाची सत्ता आहे, राज्यात
मराठा समाजाची सत्ता नाही. असे ते म्हंटले.