सांगली : बहुजननामा ऑनलाईन
नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान झाल्यावर नियत नियत फिरली आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आपण माणूस आहे असे म्हणणाऱ्या माणसावर पंतप्रधान पदावर गेल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कसे झाले असा प्रकाश आंबेडकर यांच्या बोलण्याचा रोख होता. तर प्रकाश आंबेडकरांनी भाजप सहित काँग्रेसला हि टीकेचा निशाणा बनवले आहे.राफेल करारा वरून भाजप विरुद्ध काँग्रेस असे सुरू असलेले युद्ध म्हणजे दलाली खायला मिळाली नाही म्हणून सुरु केलेले युद्ध आहे असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. मिरज (सांगली ) येथे वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते.
या मेळाव्याला संबोधित करताना आंबेडकर पुढे म्हणाले की, देशाची संपत्ती वाढली पाहिजेच, पण त्यात सर्व सामान्यांचा वाटा सुद्धा असला पाहिजे. संविधानाने टाटांना, देशमुखांना आणि देशमुखांच्या शेतातील मजूरालाही समान अधिकार दिला आहे. कोणत्याही नागरिकाला देशात कोठूनही निवडणुकीला उभे राहता आले पाहिजे अशी समता खुद्द संविधानाने प्रस्तापित केली आहे असे आंबेडकर म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीवर टीका करताना आंबेडकर म्हणाले, नोटबंदीनंतर कष्टाचे ६० रुपये बदलून घ्यायलाही ४० रुपये दलाली द्यावी लागली होती. अशी गोर गरिबांवर भीषण परिस्थिती आणणारा निर्णय सरकारने कोणताही विचार नकरता घेतला होता असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्याला सांगली, सातारा, कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक राज्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज रोडवरील अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर हा मेळावा पार पडला. या मेळाव्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. मेळाव्याच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर नेमके कोणते मुद्दे मांडणार? काय संदेश देणार? याकडे संपूर्ण राज्याचे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. संभावते नुसार प्रकाश आंबेडकरांनी पुढील लोकसभा निवडणूक लक्षात ठेवून काँग्रेस आणि भाजप यांच्यावर सडकून टीका केली आहे.