बहुजननामा ऑनलाइन टीम – महिलांच्या टी20 क्रिकेटमध्ये (Womens Asia Cup) आजवरच्या इतिहासात भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन संघांमध्ये भारत कायमच वरचढ राहिला आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 12 सामन्यांमध्ये 10 विजय मिळवले आहेत. तर पाकिस्तानला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे आशिया कपच्या रणांगणात जेव्हा या दोन टीम पुन्हा एकदा आमनेसामने आल्या तेव्हा भारत वरचढ असल्याचे दिसत होते. मात्र प्रत्यक्ष सामन्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या सामन्यात भारताला 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या आगोदरच्या सामन्यात दुबळ्या थायलंडने (Thailand) पाकिस्तानचा पराभव केला पण भारताला का नाही जमला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Womens Asia Cup)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://twitter.com/BCCIWomen/status/1578336164507176960?s=20&t=KP8oG01yvwBLWKeD2Fwl3A
हरमनप्रीतची एक चूक पडली महागात
आशिया कपच्या या महामुकाबल्यात पाकिस्ताननं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या टीमला 20 ओव्हरमध्ये 6 बाद 137 एवढीच मजल मारता आली. 138 धावांचं टार्गेट टीम इंडियासमोर सोपं वाटत असतानाच पाकिस्तानच्या सुरुवातीपासूनच भारतावर वर्चस्व निर्माण केले. अनुभवी स्मृती मानधना, मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्स लवकरच माघारी परतले. पण त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) धाडसी निर्णय घेत हेमलता आणि पूजा वस्त्रकार (Pooja Vastrakar) यांना वर पाठवले. आणि हाच निर्णय पराभवाचे कारण ठरला. (Womens Asia Cup)
पूजा वस्त्रकार, हेमलता आणि त्यानंतर दिप्ती शर्माला (Dipti Sharma) वरच्या क्रमांकावर बढती देऊन हरमप्रीत कौर स्वत: सातव्या नंबरवर बॅटिंगला उतरली.
तर गेल्या काही सामन्यात डावाची सुरुवात करणाऱ्या रिचा घोषला हरमनने आठव्या क्रमांकावर उतरवले.
कर्णधार हरमप्रीत कौरने घेतलेला हा निर्णय टीमच्या पराभवाचा कारण ठरला.
ज्यावेळी हरमनप्रीत मैदानात आली तेव्हा भारताला कमी चेंडूत जास्त धावा पाहिजे होत्या.
याच दबावामुळे मोठे फटके खेळण्याच्या नादात हरमनने आपली विकेट गमावली आणि
भारतीय संघ 124 धावात ऑल आऊट झाला. हा सामना संपल्यानंतर हरमनने याची कबुलीसुद्धा दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Womens Asia Cup | india make some changes in batting line up and lost match against pakistan in womens asia cup sport news
हे देखील वाचा :
Deepak Kesarkar | टीईटी घोटाळ्यातील दोषी शिक्षकांसंदर्भात दीपक केसरकर यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…
Wrestler Sarah Lee Passed Away | WWE स्टार सारा ली चे वयाच्या 30 व्या वर्षी निधन