मुंबई : बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबईसह उपनगारांमध्ये पहाटेपासून रिमझिम पाऊस (Rainfall) सुरु होता. सध्या ढगाळ वातावरण आहे. तर पालघर-रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. पुढचे 48 तास राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह (hunderstrrms) मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान (Weather) विभागकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 11 ते 15 डिसेंबर दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उपनगर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी पडतील तर ढगाळ वातावरण असणार आहे. धुळे आणि नंदुरबार इथे गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवस पावसाचा जोर जास्त असेल. तर 13 ते 15 डिसेंबर दरम्यान पुन्हा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिल.
जळगाव जिल्ह्यात आज पावसाची शक्यता कमी असली तरी पुढील 24 ते 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पाऊस पडले. नगर, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील 11 ते 15 डिसेंबर दरम्यान रिमझिम पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.