बहुजननामा ऑनलाईन – मोदी सरकारने असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन योजना आणली आहे. २०१५ मध्ये केंद्र सरकारने वृद्धावस्थेत अशा व्यक्तींना मदत होण्यासाठी अटल पेन्शन योजना सुरु केली होती. यामध्ये पैसे गुंतवणे खूप फायदेशीर असून निवृत्ती नंतर तुम्हाला या योजनेची फार मोठी मदत होणार आहे.
मोदी सरकारच्या या महत्त्वकांक्षी योजनेत तुम्ही दररोज ७ रुपये वाचवून तुमच्या वयाच्या ६० वर्षानंतर तुम्हाला दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळू शकते. या योजनेचा लाभ उत्त्पन्न कमी असणाऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागातील असंघटित कामगारांना मिळू शकतो. १८ ते ४० वयापर्यंतच्या व्यक्ती यामध्ये सहभागी घेऊ शकतात अशी माहिती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरीच्या वेबसाईटवर सांगण्यात आली आहे. या योजनेतून तुम्हाला तुम्हच्या वयाच्या ६० वर्ष झाल्यानंतर बचतीनुसार तुम्हाला १ हजार रुपये ते ५ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
या योजनेसंदर्भात अन्य महत्त्वाची माहिती
जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये खाते किंवा आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
प्रत्येक महिन्याला तुम्हाला विशिष्ट राशी खात्यामध्ये जमा करावी लागणार आहे. अधिक पेन्शन मिळण्यासाठी तुम्हाला अधिक राशी जमा करावी लागणार.
या योजनेमध्ये १८ ते ४० वर्ष वयापर्यंतच्या व्यक्ती सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा फायदा जे नागरिक आयकर भरत नाहीत ते देखील घेऊ शकतात. या योजनेत कमीत कमी २० वर्ष तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत.
मासिक, त्रैमासिक आणि सहामाही असे योगदान या योजनेत दिले जाणार आहे. तसेच जर योजनेतील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला त्याच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.
Visit : bahujannama.com