नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक चांगले आणि सुखी जीवन जगण्यासाठी, काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. हे नियम म्हणजे, हिंदू कॅलेंडरनुसार सर्व महिन्यांच्या अमावस्या, पौर्णिमा, चतुदर्शी आणि अष्टमीला पुरुषांनी तेल मालिश आणि मांसाहारी भोजन करू नये. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातून सर्व सूख-शांती कमी होत जाते.
पुरुषाने कधीही परस्त्रीवर वाईट नजर ठेवू नये. हे त्यांना पतनाकडे घेऊन जाते. जर धन-संपत्तीने संपन्न व्हायचे असेल तर आपले पाय चांगल्याप्रकारे स्वच्छ केल्यानंतर घरात प्रवेश करा. यामुळे घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो आणि घरात सुख-शांती कायम राहते.
देवी-देवतांच्या मूर्ती, चित्र, दीवा, शिवलिंग, सोने, शंख आणि धागा कधीही जमिनीवर ठेवू नये. किंवा कपडा अंथरूण त्यावर ठेवा.
सूर्योदय आणि सूर्यास्ताचा काळ पूजेचा असतो, या दरम्यान पुरुष आणि महिलेने शारीरीक संबंध ठेवू नयेत. अन्यथा देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.
शास्त्रांनुसार, ज्येष्ठांचा अपमान करू नका. आई-वडील, शिक्षक, महिला, ज्येष्ठांचा अपमान करणार्यांवर धनाची देवता कुबेर नाराज होतात. आर्थिक समस्या येतात.
नकारात्मक विचारांच्या आणि स्वच्छता न बाळगणार्या लोकांपासून दूर राहा. अशा लोकांमुळे आजबाजूचे वातावरण सुद्धा नकारात्मक होते, विनाशाकडे जाऊ लागता.
रविवारी तांब्याच्या भांड्याचा वापर करू नये. असे केल्याने सूर्यदेव नाराज होतात.