नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय स्टेट बँक (एसबीआय) (State Bank of India) ने सर्व मर्चंट ट्रांजक्शनसाठी आता ओटीपी अनिवार्य केला आहे. ई-मेलवर ओटीपीला तात्पुरत्या पद्धतीने डिसेबल केले आहे. यामुळे बँकेचा सल्ला आहे की, यूजर्सने ओटीपी आणि एसएमएस अलर्ट मिळवण्यासाठी आपला मोबाइल नंबर रजिस्टर करावा.
एसबीआय खात्यासोबत मोबाइल नंबर रजिस्टर करणे खुप सोपे आहे. हे काम दोन पद्धतीने करता येऊ शकते. पहिली पद्धत – बँकेच्या शाखेत जाऊन आणि दुसरी पद्धत म्हणजे – बँकेच्या अधिकृत एटीएममध्ये जाऊन करू शकता. एसबीआय एटीएमद्वारे मोबाइल नंबर रजिस्टर करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे :
1 – कार्ड स्वाइप करा. मेन्यूमध्ये ‘रजिस्ट्रेशन’ चा पर्याय निवडा.
2 – पिन टाका.
3 – मोबाइल नंबर रजिस्ट्रेशनच्या ऑपशनवर जा.
4 – आता जो मोबाइल नंबर रजिस्टर करायचा आहे, तो भरा. जर आपण योग्य नंबर भरला असेल तर, करेक्ट ऑपशन निवडा.
5 – तुमच्याकडून पुन्हा एकदा मोबाइल नंबर मागितला जाईल. पुन्हा तो भरून ‘करेक्ट’ वर क्लिक करा.
6 – हे काम केल्यानंतर एटीएम स्क्रीनवर लिहून येईल – Thank you for registering your mobile number with us.
7 – तीन दिवसांच्या आत यूजरकडे कॉन्टॅक्ट सेंटरवरून कॉल येतो.
8 – यानंतर व्यक्तीच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे एक रेफरन्स नंबर पाठवला जातो.
एसबीआय कॉल सेंटरनुसार, कॉन्टॅक्ट सेंटरमधून तीन दिवसांच्या आत कस्टमरला कॉल केला जातो. मात्र, हा सुद्धा सल्ला दिला जातो की, सुरक्षेच्या दृष्टीने आपण कॉल सेंटरमधील व्यक्तीला रेफरन्स नंबरचा हवाला देण्यास सांगा.
जर रेफरन्स नंबर जुळत असेल तरच कॉल सुरू ठेवा. एकदा हे काम झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल्सला व्हेरिफाय करावे लागेल आणि पुन्हा तुमच्या खात्यासोबत मोबाइल नंबर रजिस्टर होईल. याच संदर्भात बँकेकडून एक कन्फर्मेशन मॅसेजसुद्धा पाठवला जाईल.