मेलबर्न : वृत्तसंस्था – टीम इंडियाने (India) विश्वचषकात (T20 World Cup 2022) आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तान (Pakistan) आणि नेदरलँड (Netherlands) या दोन संघांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडिया यंदाचा विश्वकप जिंकू शकते याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे तीन फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पाकिस्तान टीमचा झिम्बाब्वेने (Zimbabwe) एका धावेने पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या खेळाडूंवर सर्व स्तरातून जोरदार टीका केली जात आहे. तसेच झिम्बाब्वेच्या खेळाडूंचं कौतुक देखील चाहते करीत आहेत. झिम्बाब्वेचे खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे टीम इंडियाने त्यांच्याविरुद्धच्या मॅचमध्ये सावधगिरी बाळगावी असा सल्ला टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी दिला आहे.
झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना टीम इंडियाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
झिम्बाब्वेला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडियाने करू नये असेदेखील सुनिल गावस्कर यांनी सांगितले आहे.
Web Title :- T20 World Cup 2022 | sreesanths daughter shot like virat kohli have you seen the video
हे देखील वाचा :