बुलढाणा : बहुजननामा ऑनलाईन – एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Shinde Group MLA Sanjay Gaikwad) गुरुवारी (८ डिसेंबर) बुलढाण्यात त्यांच्या कार्यालयावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांचे मत मांडले. पहिल्यांदा त्यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले. संजय राऊत यांनी त्यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचा गंभीर आरोप केला. यावर संजय गायकवाड (Shinde Group MLA Sanjay Gaikwad) यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. “संजय राऊत प्रसिद्धीसाठी थापा मारत आहेत, त्या खेकड्याला कोण मारणार आहे,” असा आरोप आमदार गायकवाडांनी केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गुजरात निवडणूक निकालाचा महाराष्ट्राच्या निकालावर काही परिणाम होईल का, असा प्रश्न पत्रकारांनी संजय गायकवाडांना (Shinde Group MLA Sanjay Gaikwad) विचारला. त्यावर ते म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून फार वेळ आहे आणि असा एका राज्याचा दुसऱ्या राज्याच्या निवडणुकीवर परिणाम होत नाही. लाटा आणि हवा येण्याचा काळ संपला. लोक स्थानिक नेतृत्व आणि नेत्याच्या व्यक्तिगत कामावर मतदान करतात. अनेक निवडणुकाचे निर्णय असेच ठरतात.” पुढे निवडणुकांवर त्यांचं मत व्यक्त करत संजय गायकवाड म्हणाले, “एका मुद्द्यावर निवडणुकीत कधीच मतदान होत नाही. देशात आधी हवा आली आणि लाट आली, असं व्हायचं. मात्र, आता काही कोणाच्या लाटा येत नाहीत. आता लोकांसमोर मोदींचं १० वर्षांचं काम दिसणार आहे. लोकं कामावर मतं देतील. मोदींसारखा विचार देशाला याआधी भेटला नाही. काही लोक विचारालाही मतं देतात.”
गायकवाडांना मोदींचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर परिणाम होईल का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, “काही नेत्यांच्या कामावर, विचारावर, पक्षावर मतं मिळतात. उद्या नरेंद्र मोदी आणि आमचे एकनाथ शिंदे नसतील, तर भाजपचा मतदार भाजपला सोडणार आहे का, काँग्रेसला मानणारा जो कोणी १०-२० टक्के मतदार आहे तो त्या पक्षाला सोडत नाही. लोकांना वर काय होतं याच्याशी घेणंदेणं नसतं. त्यांचा एक विचार पक्का असतो. मी या पक्षाचा, मला या पक्षाला मत द्यायचं हे त्यांचं ठरलेलं असतं आणि ते त्यालाच मत देतात.”
उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर होणाऱ्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
गायकवाड म्हणाले, “हे आम्हाला नावं ठेवतात आणि आमच्यातील कोणीच निवडून येणार नाही म्हणतात.
पण, बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शिवसेना २८८ पैकी १०० जागांपर्यंत पोहोचू शकली नाही.
आज काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, कोणताच पक्ष १०० च्या पुढे पोहोचू शकला नाही.
त्यामुळे जो चांगला उमेदवार निवडणुकीत उभा राहतो त्याची किमान ५० टक्के तरी पात्रता असते.”
संजय गायकवाड म्हणाले, “जसा मी दरवेळी कधी ३५ हजार, तर कधी ४० हजार मतांनी निवडून येतो.
तशी प्रत्येक माणसाची क्षमता असते. त्याला पक्षाची जोड असते.
काही लोकं पक्षाच्या विचारसरणीकडे पाहून मतदान करतात, काही उमेदवाराच्या किंवा पक्षाच्या कामावर-विकासावर मतदान करतात,
तर कोणी संबंधानुसार, काही जातीपातीवर, तर कोणी नातीगोती पाहून मतदान करतात.”
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shinde Group MLA Sanjay Gaikwad | shinde faction mla sanjay gaikwad criticize sanjay raut over attack threat
हे देखील वाचा :
Pune Crime | सिंहगड रोड परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; 23 जणांवर कारवाई