नांदेड:-(माधव मेकेवाड) – दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात सायन्स क्लब अन् इकोफ्रेडंलि क्लब फार अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स चे उद्घाटन सायन्स कॉलेज येथील मत्स्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. किरण शिल्लेवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दरवर्षी प्रमाणे वृक्ष रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या तयार करून त्या महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या विविध प्रकारच्या झाडांना बांधल्या व वर्षभर त्या झाडांची काळजी घेण्याची शपथ घेतली गेली. सदरील कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तूपासून या राख्या तयार करण्यात आल्या होत्या.
युवकांनी सोशल नेटवर्किंग साईटवर जास्त वेळ देण्यापेक्षा एक झाड लावणे व त्यांचि निगा राखणे हे खूप आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी यूवकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तसेच अशा प्रकारच्या क्लब द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे यूवक निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाची किमया जवळून पाहतील. सध्या भेडसावत असलेली समस्या हवामानातील बदल याची सूद्धा विद्यार्थ्यांनी दखल घेतली गेली पाहिजे. आपल्या मुळे पर्यावरण कसे सुरक्षित राहील या कडेही लक्ष दिले पाहिजे. जेनेकरून येणार्या पिढीला स्वच्छ व सुंदर पर्यावरण पाहता येईल कारण ते ही याचे हकदार आहेत.
आपण जर पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष दिले नाही तर येण्याऱ्या पिढीला आपल्याला निसर्ग व त्याचे घटक फक्त पुस्तकातील छायाचित्रात दाखवावे लागेल. म्हणुन अश्या प्रकारच्या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या जवळ आणता येईल. असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स क्लब चे समन्वयक डॉ. अरविंद चव्हाण यांनी केले. प्र. प्राचार्य गंगाधर होरके यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी मंचावर डॉ. सचिन तावडे, डॉ. जयवर्धन बलखंडे (सह समन्वयक सायन्स क्लब) यांचि प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला डॉ. भूपेश नेमान्नीवार, प्रा. संग्राम पंडित , प्रा. सचिन तिवडे, प्रा. व्यंकटेश जाधव, प्रा. ओमप्रकाश कदम, डॉ. दिपक भुसारे, प्रा. गजानन कोत्तापल्ले, डॉ. नागेश ढोले , प्रा. येगांवकर मुकुंद डॉ. माधव फेगडे यांच्या सह सायन्स विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू. नारलावार व सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कू. स्वाती देशमुख हिने केले.