मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात चढाओढ सुरु आहे. सत्तावाटपावरून भाजप -शिवसेना यांच्यातील वाद आता खोलवर गेला आहे. दोन्ही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचं म्हंटल जात आहे. भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नाही, त्यामुळे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत केला. दरम्यान निकालापासूनच संजय राऊत हे भाजपला धारेवर धरत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराच्या तरुण भारत या वृत्तपत्राने सलग दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांना टार्गेट केलं आहे.
‘राजकीय प्रवक्ता म्हणून जर नागपूरचा ९३ वर्षांची परंपरा लाभेलला तरुण भारत माहित नसले तर हि बौद्धिक दिवाळखोरी असल्याचे लिहीत राऊत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. महत्वाचे म्हणजे तरुण भारत ने उद्धव ठाकरे यांच्यावर अजिबात टीका केलेली नाही.
तरुण भारत या वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून म्हंटले आहे कि, ‘मला तरुण भारत माहित नाही, असे सांगून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करणाऱ्या स्वयंघोषित अनुभवी पत्रकारचे अभिनंदन करावे लागेल, परंतु तरुण भारत संपूर्ण राज्याला ठाऊक आहे. तसेच ते पुढे म्हणाले कि, नेहमीच पक्षप्रमुखांना अडचणीत आणण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे, कि काय हे त्यांच्या वागणूकीतून दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला नुसते भाजपचे सरकार मको आहे, त्यांना महायुती हवी आहे, आणि असे झाले नाही तर ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ हा दोष मारून घेण्याच्या पलीकडे शिवसेनेकडे पर्यंत उरणार नाही.