बहुजननामा ऑनलाइन टीम – कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या 2 महिन्यापेक्षा अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये अद्यापही तोडगा न निघाल्याने आंदोलन दिवसेंदिवस चिघळत आहे. दुसरीकडे टिकरी, सिंघू आणि गाझीपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाकेबंदी केंद्र सरकारने केली आहे. चीनच्या वा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजे, असा टोला लगावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारला सुनावले आहे.
राज ठाकरे यांनी शनिवारी (दि. 6) बेलापूर येथील न्यायालयात हजर राहिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मला असे वाटतं हे प्रकरण फारच चिघळलं आहे. आपण सगळे पाहतोय, शेतकऱ्यांच्या मागे कोण आहेत. त्यांना पैसे कुठून येतोय वगैरे. सरकारने जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होते. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर बोलताना राज ठाकरे यांनी मोदी सरकारला