मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. कोरोना बाधितांची संख्या जास्त असली तरी आता कोरोना बाधितांची ही संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आलं आहे. त्यातच महापालिकेने कोरोना रुग्णांच्या क्वारंटाईनच्या नियमात मोठे बदल केले आहेत.
क्वारंटाईनचे नवे नियम
आता पालिकेने क्वारंटाईनचे नियम बदलले असून 50 वर्षे व त्यापुढील वयाच्या कोरोना बाधित रुग्णाला आता होम क्वारंटाईनमध्ये राहता येणार नाही. या रुग्णांना कोणतेही लक्षणं नसेल आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली तर अशा रुग्णांना कोविड सेंटरमध्ये रहावे लागणार आहे. तसेच अशा रुग्णांच्या घरी आणि इमारत किंवा चाळीच्या कॉमन जागांवर पालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. 50 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींचा मृत्यूदर वाढत असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी Morbidity आणि सौम्य लक्षणे असलेल्या 60 वर्षे वयापर्यंतच्या व्यक्तींन घरात राहता येत होते. मात्र आता पालिकेने परिपत्रक काढत होम क्वारंटाईनचे नियम बदलले आहेत.
करोना टेस्ट अनिवार्य
अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबईत अनेक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही राज्यातील हॉटेल सेवा सुरु करण्यात आलेली नाह. आजपासून आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत परदेशातून एअर लाइन्सने मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.