पाटणा : वृत्तसंस्था – सुशांतसिंग राजपूत प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असताना हे प्रकरण एका खोल षडयंत्राकडे निर्देश करत आहे. तसेच महाराष्ट्र सरकार वारंवार असे म्हणत आहे की या प्रकरणाची चौकशी सीबीआय नव्हे, तर मुंबई पोलिस करतील. त्याचे आता राजकीय अर्थही काढले जात आहेत. या दरम्यान मुंबई पोलिसांच्या या वृत्तीबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. खरंतर पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि एक पथक मुंबईला गेले आहे. पण मुंबई पोलिस बिहार पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे. दरम्यान पाटणा पोलिसांच्या एका बड्या अधिकाऱ्याने मोठा खुलासा करत म्हटले आहे की, मुंबई पोलिसांच्या कोणत्याही अधिकाऱ्याने संवाद केलेला नाही.
अशीही बातमी आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी बिहार पोलिसांना गाडीदेखील पुरवली नाही. ते कधी आरोपी रिया चक्रवर्ती आणि कधी सुशांतशी संबंधित कंपन्यांकडे जातात आणि तेही ऑटोमध्ये. या प्रकरणी आता बिहार सरकारने अधिकृतपणे महाराष्ट्र सरकारवर आरोप केले आहेत. बिहार सरकारचे महाधिवक्ता ललित किशोर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, जेव्हा पोलिस एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात तेव्हा राज्य सरकार सहकार्य करते. परंतु मुंबई पोलिस तसे करत नाहीत हे दुर्दैव आहे.
Whenever police from one state go to another state for investigation, then the respective state govt & officials cooperate. In this case, it's unfortunate that they (Mumbai Police) are not cooperating: Lalit Kishore, Advocate Gen, Bihar Govt on #SushantSinghRajputDeathCase pic.twitter.com/PvBchX2UQr
— ANI (@ANI) July 31, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पाटणा पोलिसांच्या टीमला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना विषाणूमुळे मुंबईतील रस्त्यांवर ऑटो व टॅक्सीची कमतरता आहे. अशा परिस्थितीत कोणाच्या घरी जाऊन चौकशी करण्यास गैरवर्तन वाटत आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांवर आरोप आहे की ते बिहार पोलिसांना सहकार्य करत नाही.