मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – चांगलं काम केलं तरी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस टीकाच करणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात. फडणवीस वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर सतत टीका करत असतात. असं म्हणत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे,” अशी माहिती यावेळी अनिल देशमुख यांनी दिली. येरवडा कारागृहबाबत काही मागण्या होत्या. त्याबाबतचं निवेदन यावेळी अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आलं. तसंच भिडे, एकबोटे यांच्यावर रितसर कारवाई होईल आणि चार्जशीटचा प्रस्ताव देखील मंजूर केला गेला आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. बी. जी. कोळसे पाटलांची सुरक्षा का काढली याचा आढावा घेत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
… त्यामुळे लक्ष देण्याची गरज नाही
दरम्यान, याआधी सुबोध कुमार जैस्वाल यांच्यावरून तुम्हाला देवेंद्र फडणवीस हे लक्ष करीत आहे असं विचारलं असता ते म्हणाले होते की, “देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता आहेत. त्यामुळे जे काही आमच्याबद्दल बोलणार ते विरोधातच बोलणार . त्यामुळे त्यांच्याकडे एवढं काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही.”